IRDA चा महत्वाचा निर्णय, ज्येष्ठांना आरोग्य विमा; वयाची अट हटवून टाकली!

hanuman

Active member
images-1.jpeg

  • भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली ६५ या वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे. त्यामुळे या सुविधेपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



एक एप्रिलपासून सुधारित नियम लागू केले आहेत. अवाजवी उपचारखर्चातून लोकांची सुटका व्हावी, त्यांना आरोग्य सुरक्षा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत आयआरडीएआयने म्हटले आहे की, कंपन्यांनी सर्व वयोगटातील नागरिकांना विमा घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले, महिला, गरोदर माता आदी सर्व घटकांना समोर ठेवून कंपन्यांनी पॉलिसी तयार कराव्यात.



गंभीर आजारामुळे नकार देऊ नका

कॅन्सर, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्स यांसारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी देताना विमा कंपन्या नकार देत असत. परंतु आता यासाठी नकार देण्यास कंपन्यांना मनाई करण्यात आली आहे

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock