मोठी बातमी ! अग्निपथ योजनेत आता होणार महत्त्वपूर्ण बदल; सैन्याकडून सर्वेक्षण सुरू! – Agneepath Scheme 2024

hanuman

Active member
Army SSC RVC Bharti 2024

Agneepath Bharti 2024 Update

Agneepath Bharti 2024: भारतीय लष्कर सध्या एक अंतर्गत सर्वेक्षण करत आहे. यात अग्निवीरशी संबंधित प्रश्न विचारले जात आहेत. या योजनेचा भरती प्रक्रियेवर होणारा परिणाम जाणून घेणे हा त्याचा उद्देश आहे. या महिन्याच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

भारतीय लष्करी सेवेतील (Indian Army) भरतीसाठी केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या अग्निपथ योजनेत (Agnipath Scheme) बदल होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेत हे बदल होऊ शकतात.

भारतीय लष्कर सध्या एक अंतर्गत सर्वेक्षण करत आहे. यात अग्निवीरशी संबंधित प्रश्न विचारले जात आहेत. या योजनेचा भरती प्रक्रियेवर होणारा परिणाम जाणून घेणे हा त्याचा उद्देश आहे. या महिन्याच्या अखेरीस संपण्याची शक्यता आहे. या अग्निवीर, कर्मचारी भरती आणि प्रशिक्षण यांच्यासह सर्व संबंधितांकडून काही माहिती मागविण्यात आली आहे.​

अग्निवीर आणि जुने सैनिक

युनिट आणि सब-युनिट कमांडर्सना अग्निवीर आणि या योजनेपूर्वी आलेल्या सैनिकांच्या कामगिरीबद्दल अभिप्राय देखील द्यावा लागेल. यासोबतच त्यांनी अग्निवीरमध्ये कोणत्या सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी पाहिल्या आहेत हे देखील सांगावे लागेल. या माहितीच्या आधारे लष्कर योजनेत काही बदल करण्याची शिफारस करू शकते, असे वृत्त आहे.​


असे आहेत प्रश्न ?

अग्निवीर सैन्यात तुम्हाला का सहभागी व्हायचं आहे?
लष्कराचा एक भाग होण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात?
याशिवाय ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी अर्जदार कसे आहेत?
शहरी आणि ग्रामीण भागातील अर्जदारांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेविषयी काय मते आहेत? अशी माहितीही उमेदवारांना द्यावी लागणार आहे.
ही योजना लागू झाल्यानंतर लष्करातील भरतीवर एकूण काय परिणाम होतो?​


Agneepath Scheme Yojana 2023


– The ‘Agniveer’ recruitment process for candidates from eight districts will be held in the month of November as Agneepath Scheme 2023. The recruitment rally will be held at the University Grounds in Kalina. This is the second phase of recruitment after the written examination conducted in the month of April. The written examination was held in April for the categories of Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/Store Keeper Technician, Agniveer Tradesman (10th pass) and Agniveer Tradesman (8th pass). Candidates hailing from eight districts – Mumbai city, Mumbai suburbs, Nashik, Raigad, Palghar, Thane, Nandurbar and Dhule – participated. This is the recruitment of qualified candidates in that examination. The test will be conducted at the university ground from November 1 to 7.​



आठ जिल्ह्यातील उमेदवारांसाठीची ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात होत आहे. कलिनाच्या विद्यापीठ मैदानावर ही भरती रॅली होणार आहे. एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेनंतरची ही दुसऱ्या टप्प्यातील भरती आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर तंत्रज्ञ, अग्निवीर ट्रेड्समन (१० वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर ट्रेड्समन (८ वी उत्तीर्ण) श्रेणींसाठी एप्रिल महिन्यात लेखी परीक्षा झाली होती. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यांचे रहिवाशी असलेले उमेदवार त्यात सहभागी झाले होते. त्या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची ही भरती आहे. विद्यापीठाच्या मैदानावर १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ही चाचणी घेतली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

याआधी मुंबई आणि परिसरातील आठ जिल्ह्यांतील अग्निवीर भरतीची प्रक्रिया पार पडली होती. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार व धुळे, या जिल्ह्यांतील युवक या भरतीत सहभागी झाले होते. यावेळी उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती.​





Agneepath Bharti 2023 – The Government of India had last year implemented a scheme called ‘Agniveer’ for recruitment in the armed forces. There was widespread opposition to the plan at the time. Defying this opposition, the government implemented the scheme. It has been a year since the first batch was recruited under the scheme and significant changes are being made in the scheme, senior sources said. “Under this, 50 per cent of the youth recruited under the scheme will be retained,” he said. Under the original plan, the percentage was only 25. The remaining 75 per cent were to be given retirement by paying a certain amount. If this change is implemented, 50 percent of the youth will be retained, while the remaining 50 percent will be given retirement.



भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या तुकडीला भरती होऊन आता एक वर्ष झाले असून या योजनेत महत्त्वपूर्ण पालट केले जात आहेत, अशी वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. ‘यांतर्गत या योजनेतून भरती झालेल्या तरुणांपैकी ५० टक्के तरुणांना कायम केले जाईल’, असे बोलले जात आहे. मूळ योजनेनुसार ही टक्केवारी केवळ २५ होती. तसेच उर्वरित ७५ टक्के तरुणांना एक विशिष्ट रक्कम देऊन निवृत्ती दिली जाणार होती. जर हा पालट कार्यान्वित झालाच, तर ५० टक्के तरुणांना कायम केले जाईल, तर उर्वरित ५० टक्क्यांना निवृत्ती दिली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

१. ही योजना नौदल, हवाईदल आणि भूदल या तीनही दलांसाठी असून यासंदर्भात सरकारने सध्या अधिकृतपणे काहीही घोषित केलेले नाही. तरी यासंदर्भात संरक्षण विभागातील अधिकार्‍यांची पहिली बैठक झाली असल्याची माहिती आहे.

२. नौदल आणि हवाईदल यांमध्ये बहुतेक सैनिक हे तांत्रिक काम करत असतात. सैन्यातही सैनिकांना अनेक विभागांत तांत्रिक कामे करावी लागतात. त्यामुळे ५० टक्के भरती झालेल्या सैनिकांना कायमस्वरूपी करण्याच्या विचारात सरकार आहे.

३. पहिली तुकडी भरती होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे सरकार लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.





Last year, the central government had launched an ambitious scheme called Agneepath. Through this, young men and women can join the army for four years as fire fighters. The Indian Army has now demanded a change in this plan. There is a demand for permanent recruitment of 50 percent fire fighters who retire after four years. At present, only 25 percent of firemen who retire after four years are given the option of permanent employment. However, the Indian Army has demanded a change in this. The news channel Asianet has given the information that consideration is going on in this regard.



गेल्या वर्षी केंद्र सरकारने अग्निपथ ही महत्त्वाकांक्षी योजना लाँच केली होती. या माध्यमातून तरुण-तरुणी अग्निवीर म्हणून चार वर्षांसाठी सैन्यात सहभागी होऊ शकतात. या योजनेत आता बदल करण्याची मागणी भारतीय सैन्याने केली आहे. चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या ५० टक्के अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरुपी घेण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांपैकी २५ टक्के अग्निवीरांनाच कायमस्वरुपी नोकरीचा पर्याय देण्यात येतो. मात्र, यात बदल करण्याची मागणी भारतीय सेनेने केली आहे. याबाबत विचार सुरू असल्याची माहिती एशियानेट या वृत्तवाहिनीने दिली आहे.

भारताच्या सैन्यदलात दर वर्षी सुमारे ८० हजार सैनिकांची भरती होत होती. मात्र, कोविड महामारीमुळे दोन वर्षं ही भरती झालेली नाही. मात्र या दोन वर्षात कित्येक सैनिक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सैन्याच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठीच लष्कराकडून अग्निवीर योजनेत बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ५० टक्के अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरुपी घेण्याचा विचार करावा, तसेच अग्निवीरांच्या संख्येत वाढ करून, ही भरती वेगाने करावी अशा मागण्या लष्कराने केल्या आहेत.

सध्या ४० हजार अग्निवीरांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दर वर्षी ही संख्या वाढवण्यात येणार आहे. २०२६ पर्यंत एकूण १ लाख ७५ हजार अग्निवीर सैन्यात दाखल होतील असं लक्ष्य आहे. मात्र, आतापासूनच सैन्यात सुमारे दीड लाख सैनिकांची कमतरता आहे.

एव्हिएशन, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा तांत्रिक क्षेत्रामध्ये कुशल सैनिकांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. सध्या अग्निवीर भरतीसाठीची वयोमर्यादा १७.५ ते २१ वर्षे एवढी आहे. यामुळे टेक्निकल बॅकग्राऊंड असणारे अग्निवीर मिळणं अशक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुशल अग्निवीरांची संख्या वाढवण्यासाठी भरतीची कमाल वयोमर्यादा २३ वर्षे करण्याबाबत देखील विचार सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितंल.



लष्करानं अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पात्रता निकष वाढवण्यात आले आहेत. प्री स्किल्ड युवा देकील अग्निपथ भरतीत सहभाग घेऊ शकतात. आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण टेक्निकल ब्रांचमध्ये भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात. यातून प्री-स्किल्ड युवांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. इतकंच नाही तर यामुळे ट्रेनिंगसाठीचा कालावधी देखील कमी होणार आहे. या मोठ्या बदलानंतर आता आणखी जास्त युवा उमेदवारांना योजनेत सामील होता येणार आहे.

१६ फेब्रुवारीपासून अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्करात अग्नीवीरांच्या भरतीसाठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. अग्निपथ भरती वर्ष २०२३-२४ साठी अविवाहित पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in येथे भेट देऊ शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीची १५ मार्च २०२३ ही अंतिम मुदत आहे. तर निवड परीक्षा १७ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

नोटिफिकेशननुसार अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर किपर, ट्रेड्समॅनच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. अग्नीवीर निवड प्रक्रियेत नुकतंच बदल करण्यात आले होते. यानुसार उमेदवारांना सर्वात आधी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना फिजिकल टेस्ट साठी निमंत्रित केलं जाईल.

अर्जासाठीची पात्रता काय?
१६ फेब्रुवारीला जारी नोटिफिकेशननुसार अग्नीवीर (जनरल ड्युटी) पदासाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर अग्नीवीर (टेक्निकल) यासाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्नीवीर क्लर्क (स्टोअर कीपर) पदासाठी कमीतकमी ६० टक्क्यांनी १२ उत्तीर्ण उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. अग्नीवीर ट्रेड्समनपदासाठी ८ वी आणि १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात. आता नव्या बदलानुसार आयआयटी-पॉलिटेक्निक उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.​



Agneepath Scheme Yojana 2023 – The first batch of Agniveers have started training at the Artillery Centre in Hyderabad. A large number of candidates applied to become Agniveer. Out of it 2265 selected candidates are now undergoing training at Golconda Training Center in Hyderabad. The Agniveers will undergo physical and other kinds of training for 31 weeks. All these soldiers who join the army for various tasks as firefighters will be given training by the army. In the initial 10 weeks, they will be identified for their strength areas, post that there will be a focussed 10-week training for them. Read the complete details given below and keep visiting

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीने हैदराबाद येथील तोफखाना केंद्रात प्रशिक्षण सुरू केले आहे. अग्निवीर होण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी 2265 निवडक उमेदवार आता हैदराबाद येथील गोलकोंडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. अग्निवीरांना ३१ आठवडे शारीरिक आणि इतर प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल. अग्निशामक म्हणून विविध कामांसाठी सैन्यात भरती होणाऱ्या या सर्व सैनिकांना लष्कराकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुरुवातीच्या 10 आठवड्यांमध्ये, त्यांना त्यांच्या ताकदीच्या क्षेत्रासाठी ओळखले जाईल, त्यानंतर त्यांच्यासाठी 10-आठवड्यांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाईल. खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि MahaBharti.in ला भेट देत रहा

Agniveers First Batch Training Program in Hyderabad


अग्निवीर सैन्य भरती.. २२६५ जणांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण हैदराबादेत सुरु..

  1. अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर देशभरातील तरुणांनी याला विरोध दर्शवला होता. असे असतानाही मोठ्या संख्येने तरुणांनी अग्निवीर होण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी निवड झालेल्या २२६५ जणांना आता हैदराबादमधील प्रशिक्षण गोलकोंडा केंद्रात प्रशिक्षण देण्यात येत आहे.​
  2. हैदराबाद, गोलकोंडा (तेलंगणा): सैनिकांच्या प्रशिक्षणात एक अभिनव अध्याय सुरू झाला आहे. केंद्र सरकारच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेचा भाग म्हणून निवडलेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण हैदराबाद येथील गोलकोंडा येथे असलेल्या तोफखाना केंद्रात सुरू झाले आहे. येथे तरुणांना देशाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात येत आहे. सामान्य तरुणांना ‘पोलादी पुरुष’ बनवण्यात येणार आहे.​
  3. अग्निवीर’ची तुकडी विविध पदांवर प्रशिक्षणासाठी भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक, स्टोअरकीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन म्हणून प्रशिक्षणासाठी भारतीय सैन्यात सामील झाली आहे. अग्निवीर म्हणून सैन्यात विविध कामांसाठी दाखल होणाऱ्या या सर्व सैनिकांना लष्कराकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.​
  4. ३३०० जणांची दुसरी तुकडी: यावेळी आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर राजीव चौहान म्हणाले, ‘पहिल्या बॅचमध्ये २,२६५ अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. आम्ही पद्धतशीर आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रशिक्षणाचे कार्यक्रम तयार केले आहेत. पहिल्या 10 आठवड्यांमध्ये शारीरिक व्यायाम, कवायती, मूलभूत शस्त्रे प्रशिक्षण आणि नंतर प्रगत लष्करी प्रशिक्षण यांचा समावेश आहे. मार्चमध्ये याच केंद्रात आणखी 3300 लोकांसाठी प्रशिक्षणाची दुसरी तुकडी सुरू होईल.​
  5. अग्निवीरांसाठी हे देशातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या युनिटमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ काम करावे लागते. लष्करी भरतीतील रिक्त पदांवर अवलंबून, कौशल्य दाखविणाऱ्यांपैकी २५ टक्के जणांची सैन्यात भरती करण्यात येणार आहे. पूर्वी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाप्रमाणे आता आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. आम्ही त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून देत आहोत. आम्ही त्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी करत आहोत. याशिवाय आम्ही खेळ आणि शिक्षणाला प्रोत्साहन देत आहोत.​
  6. यावर्षी लष्करात ४० हजार अग्निवीर जवानांची भरती होणार असून, त्यापैकी बहुतांश जवानांना हैदराबादमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या बॅचचे प्रशिक्षण 2 जानेवारीपासून सुरू झाले असून ते 8 महिने चालणार आहे. या पार्श्वभूमीवर अग्निवीरांच्या प्रशिक्षण पद्धती आणि केंद्रातील प्रशिक्षण सुविधा सोमवारी प्रसारमाध्यमांना दाखविण्यात आल्या. विशेष म्हणजे देशाच्या विविध भागांतून तसेच तेलुगू राज्यांतून निवडले गेलेले या तुकडीचे बहुतेक अग्निवीर हे शेतकरी कुटुंबातील आहेत.​




Agneepath Scheme 2022, Latest Information


Agneepath Scheme Yojana 2022: The latest update for Agneepath Scheme 2022, As per the latest news, The Delhi High Court has refused to stay the Agneepath scheme. For more details visit our website . Further details are as follows:-​

अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) आव्हान देणाऱ्या प्रकरणावर आज, गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यास नकार दिलाय.
  • 14 जून रोजी केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणली, त्याअंतर्गत 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची सैन्य दलात चार वर्षांसाठी भरती करण्याची तरतूद करण्यात आली होती.
  • या योजनेअंतर्गत भरती झालेल्या युवकांपैकी 25 टक्के तरुणांना चार वर्षांनंतर लष्करात (Army) कायमस्वरूपी नोकरी देण्यास सांगण्यात आले.
  • मात्र, यानंतर तरुणांमध्ये या योजनेबाबत संताप व्यक्त होत होता.
  • सरकारने या योजनेसाठी कमाल वयोमर्यादा वाढवून 23 वर्षे केली होती.
  • या याचिकेविरोधात देशातील विविध उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या.
  • लष्कराच्या भरतीसाठी केंद्राच्या नव्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) संबंधित मंत्रालयांमार्फत केंद्राकडे उत्तर मागितले.
  • अग्निपथ योजना केंद्र सरकारने 14 जून रोजी सुरू केली होती.
  • याअंतर्गत चार वर्षे लष्करात तरुणांची भरती करण्याची तरतूद करण्यात आली होती.

प्रलंबित असलेल्या याचिका दिल्ली हायकोर्टात ट्रान्सफर

  • गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, सशस्त्र दलात भरतीसाठी केंद्राने आणलेल्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
  • अग्निपथ विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका दिल्ली हायकोर्टात वर्ग केल्या.
  • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला सांगितलं होतं की, सुप्रीम कोर्टाने आपल्यासमोर प्रलंबित असलेल्या याचिका दिल्ली हायकोर्टात ट्रान्सफर केल्या आहेत.

योजनेविरोधात केरळ, पंजाब आणि हरियाणा, पाटणा, उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका

अग्निपथ योजनेविरोधात केरळ, पंजाब आणि हरियाणा, पाटणा आणि उत्तराखंड या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने या सर्व उच्च न्यायालयांना सांगितले होते की, त्यांच्यासमोर दाखल याचिका एकतर दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग कराव्यात किंवा स्थगित ठेवाव्यात. जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत हे केले पाहिजे. त्यावर गेल्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने हस्तांतरित केलेल्या खटल्यांची फाइल अद्याप पोहोचलेली नाही, असे म्हटले होते.​


गृहमंत्र्यांची घोषणा – अग्निवीरांना पोलीस भरतीत संधी देणार!! Agneepath Scheme 2022


Agneepath Scheme Yojana 2022: Good News!! There is a big decision about Agneepath Scheme 2022. Under Agneepath Yojana, the candidates who complete their service will be inducted into the state police force. For more details about Agneepath Scheme 2022, visit our website . Further details are as follows:-

देशात केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेला जोरदार विरोध केला जात असताना कर्नाटक सरकार अग्नीपथ भरती योजने बाबत मोठा निर्णय घेतला आहे. अग्नीपथ योजनेअंतर्गत जे उमेदवार त्यांची सेवा पूर्ण करतील त्या अग्नविरांना राज्य पोलिस दलात सामील करण्यात येणार आहे. कर्नाटकचे गृहमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच या योजनेला विरोध करण्यासाठी होत असलेल्या निदर्शनांचा मी निषेध करतो असेही कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले आहे.​

Details regarding this scheme are given below –

Conducting BodyIndian Army
Name of schemeAgneepath Recruitment 2022
Launched by Department of Military Affairs
Number of VacanciesAround 1.25 Lakh
Date of Final notificationyet to be updated
Agneepath Recruitment Online Form DateJune/july, 2022
Area of ServiceIndian Army, Navy, Air Force
Time span4 years
age limit17.5-21 years
official linkJoinindianarmy.nic.in

Eligibility Criteria For Agneepath Scheme

CategoryEducationAge
Soldier General DutySSLC/Matric with 45% marks in aggregate.No% required if higher qualification.17.5 – 21 Years
Soldier Technical10+2/Intermediate exam passed in Science with Physics, Chemistry, Maths and English. Now eight age for higher qualification.17.5 – 21 Years
SoldierClerk / StoreKeeper Technical10+2/Intermediate exam passed in any stream(Arts, Commerce, Science)with 50% marks in aggregate and min 40% in each subject. Weight age for higher qualification.17.5 – 21 Years
Soldier Nursing Assistant10+2/Intermediate exam passed in Science with Physics, Chemistry, Biology and English with min 50% mark sin aggregate and min40% in each subject. Now eight age for higher qualification.17.5 – 21 Years
Soldier Trades man17.5 – 21 Years
(i)GeneralDutiesNon Matric17.5 – 21 Years
(ii)SpecifiedDutiesNon Matric17.5 – 21 Years

Pay Scale Under Agneepath Scheme


Agneepath Scheme Yojana 2022



Agneepath Scheme 2022


Agneepath Scheme Yojana 2022 : There are a total of 1,25,000 Agniveer recruits in the next few years. The first phase of the online exam starts on the 24th of July 2022. The first batch will be registered by December and the training will begin by December 30. Further details are as follows:-​

महत्त्वाचे – येत्या काही वर्षांमध्ये सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!


केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा (Agnipath scheme) मुद्दा चांगलाच तापतो आहे. त्यात आता देशभरात याच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. त्यात सरकारतर्फे तरुणांच्या समस्या सोडवण्याचं काम सुरू आहे. अग्निपथ योजनेबाबत लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी पत्रकार परिषद (Indian Army Press conference on Agnipath) घेऊन आढावा बैठकीची माहिती दिली.

Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Agneepath Scheme

  • अग्निपथ योजनेद्वारे आम्हाला देशाच्या तिन्ही सैन्यात तरुणाई आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आणायचा आहे.
  • आज मोठ्या संख्येने जवान 30 च्या पुढे आहेत आणि अधिकाऱ्यांना पूर्वीपेक्षा खूप उशीरा कमांड मिळत आहे. लष्कराचे वय कमी करणे हे आमचे प्राधान्य आहे.
  • भारताच्या तिन्ही सैन्यात संवेदना आणि उत्साह यांचा चांगला मिलाफ असावा, अशी आमची इच्छा आहे.
  • अग्निवीरांना’ सियाचीन आणि इतर भागात तैनाती करताना तोच भत्ता मिळेल जो सध्या सेवा बजावत असलेल्या नियमित सैनिकांना लागू आहे.
  • सेवेच्या बाबतीत अग्निवीरांसाठी कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
  • पुढील 4-5 वर्षांत आम्ही (सैनिक) 50-60,000 भरती करू आणि नंतर ते 90,000 ते 100000 पर्यंत वाढवू असंही त्यांनी म्हंटल आहे.

Agneepath Scheme – Agniveer Apply Online


24 जूनपासून सुरू होईल ऑनलाइन प्रोसेस

  • भारतीय हवाई दलाचे अधिकारी एअर मार्शल एसके झा म्हणाले, अग्निवीर बॅच क्रमांक 1 नोंदणी प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल आणि पहिला टप्पा ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू होईल.
  • पहिल्या बॅचची डिसेंबरपर्यंत नोंदणी केली जाईल आणि 30 डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू होईल.
  • अग्निपथ योजनेबद्दल, भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, या वर्षी 21 नोव्हेंबरपासून पहिले नौदल ‘अग्नीवीर’ प्रशिक्षण प्रतिष्ठान आयएनएस चिल्का, ओडिशा येथे पोहोचण्यास सुरुवात होईल.

Agneepath Yojana Recruitment 2022


सव्वा लाख भरती होणार

योजनेचे विश्लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही पहिल्या वर्षी 46,000 भरती करून छोटी सुरुवात केली आहे. नजीकच्या भविष्यात आमचा ‘अग्नीवीर’ संख्या 1.25 लाखांपर्यंत पोहोचेल. देशसेवेत बलिदान देणाऱ्या अग्निवीरला एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे.​

योजना मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही

भारतीय सशस्त्र दलाच्या या योजनेची नितांत गरज आहे, त्यामुळे ती मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात, तिन्ही सेवांमध्ये अधिका-यांच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या सर्व भरती केवळ ‘अग्निपथ योजने’द्वारेच केल्या जातील.​

Agneepath Scheme 2022 Apply Online


Agneepath Scheme Yojana 2022



Agneepath प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती, गृह विभागाची मोठी घोषणा !


Agneepath Scheme Yojana 2022 – Agneepath प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती, गृह विभागाची मोठी घोषणा – केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशातील विविध भागांमधून तीव्र विरोध होतोय. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून या योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट देण्यात आली आहे. यानुसार सीएपीएफ आणि आसाम रायफल्स सारख्या दलात चार वर्षे पूर्ण केल्यानंतर अग्निपथ योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना सैन्यात १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.

अग्निवीरांना सीएपीएफ (CAPF) आणि आसाम रायफल्स (Assam Rifles) या दोन केंद्रीय दलांमध्ये भरतीसाठी कमाल वयोमर्यादेपेक्षा तीन वर्षांपर्यंतची सवलत मिळू शकले. तसेच अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी ही सवलत पाच वर्षांची असेल असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.

अग्निपथ योजनेला विरोध दर्शविण्यासाठी देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. बिहारमधील जेहानाबादमध्ये आंदोलकांनी बस आणि ट्रक जाळले. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यासोबतच इंटरनेटही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे अग्निपथ योजना ?
भारतीय सैन्यात भरतीसाठी नवीन नियम लागू झाले आहेत. केंद्र सरकारने आजपासून ‘अग्निपथ भरती योजना’ (Agneepath Recruitment Scheme) सुरू केली आहे. यामुळे तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती नव्या योजनेचा शुभारंभ करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

६ महिन्यांचे प्रशिक्षण
करोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांपासून सैन्यात भरती थांबली आहे. पूर्वी जिथे नवीन सैनिकांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागत होते आणि वेतनश्रेणीही कमी होती. आता तिथे फक्त ६ महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

इतका मिळेल पगार
लष्करातील पहिले निवृत्तीचे वय सुमारे ४० वर्षे होते. त्याचबरोबर आता नव्या नियमांनुसार पहिली ४ वर्षे सैनिकांची भरती होणार आहे. आता सैनिकांना कमी पगार मिळतो, पण नवीन नियमानुसार त्यांना सुमारे ३० हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात येत आहे.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock