सध्या महाराष्ट्र राज्यभरातील पोलिस खात्यात १७ हजार ४७१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यात अभियांत्रिकी, डीटीएड, बीएड अशा विविध पदवीधार उमेदवारांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून राज्यातील बेरोजगारीचे आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. जिल्हा परिषद, तलाठी अशा विभागांच्या भरतीतही जागांपेक्षा अधिक अर्ज आलेले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदासाठी एका जागेसाठी सुमारे ७८० उमेदवार आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेसाठी २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार आहेत.
राज्यभरातील पोलिस खात्यात १७ हजार ४७१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यात अभियांत्रिकी, डीटीएड, बीएड अशा विविध पदवीधार उमेदवारांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून राज्यातील बेरोजगारीचे आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. जिल्हा परिषद, तलाठी अशा विभागांच्या भरतीतही जागांपेक्षा अधिक अर्ज आलेले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदासाठी एका जागेसाठी सुमारे ७८० उमेदवार आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेसाठी २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार आहेत.
पण, विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत, असा अनुमान आहे. लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येवू शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती पूर्ण करावी लागणार आहे, असे अनुमान आहे.
पण, विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत, असा अनुमान आहे. लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, यावेळी अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येवू शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती पूर्ण करावी लागणार आहे, असे अनुमान आहे.
The post appeared first on .