राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पोलिस भरतीमध्ये नुकतीच वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना किमान दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेने वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. त्याबाबतचे निवेदन प्रशासन आणि गृहमंत्र्यांना देखील पाठविण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेने केले आहे. राज्यात पाेलिस भरती हाेणार असल्याने ग्रामीणसह शहरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अनेक भागात युवक पाेलिस भरतीसाठी तयारी करु लागले आहेत. त्यासाठी व्यायाम आणि अभ्यास या दाेन्ही गाेष्टींचा कसून सराव केला जात आहे.
दरम्यान मागील वर्षी राज्य सरकारने घोषणा करूनही पोलिस भरती झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील 30 ते 40 हजार विद्यार्थी हे आता होणाऱ्या भरतीत वयोमर्यादातून बाद होणार आहेत. त्यांना ही वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेद्वारे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
The post
appeared first on
.